कामाचं बोला…, ठाकरे बंधूंच्या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भडकले

Eknath Shinde On Raj-Uddhav Thackeray Together : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी (BMC Election) ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. ठाकरे बंधू (Raj Thackeray-Uddhav Thackeray Together) एकत्र येणार का? याबाबत सध्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर नेतेमंडळी यावर प्रतिक्रिया देखील देताना दिसत आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर आम्हाला आनंद होईल अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यावर प्रतिक्रिया देताना चिडल्याचे पाहायला मिळाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या दरे गावी आहेत. यावेळी पत्रकारांनी त्यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न विचारला मात्र त्यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले. यावेळी शिंदे पत्रकारावर चिडल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांनी पत्रकाराला जाऊ दे यार, काय करता कामाचं बोला असं म्हटलं.
तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर शिवसेना (शिंदे गट) आणि मनसे यांच्यात मुंबई महानगर पालिका निडवणुकीसाठी युती होणार अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत होती मात्र आता राज ठाकरे यांनी सिने अभिनेता महेश मांजरेकर यांच्या एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेसोबत युती करण्याचे संकेत दिले आहे. जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर याचा मोठा फटका मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्याचे राजकारणात राजकीय भूकंप येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद : मुख्यमंत्री फडणवीस
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे. कोणीही मतभेद विसरुन एकत्र येत असतील तर वाईट वाटण्याचे कारण नाही. फक्त मला वाटतं की, यावर माध्यमे जास्त विचार करत आहे. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
केंद्र सरकारची जबरदस्त योजना, मिळणार स्वस्त व्याजदरात 20 लाख; जाणून घ्या सविस्तर
तसेच त्यांनी यावेळी राज ठाकरे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ठेवलेल्या ऑफरवर देखील प्रतिक्रिया दिली. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ऑफर देणारे हे प्रतिसाद देणारे ते, मी काय बोलणार? ही बाब त्यांना विचारा. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.